Tuesday, 20 September 2011

जखम!!!

जखम!!!
जखम नविन झाली तरी रक्त कही बदलत नाही ..
नविन रक्त बनले तरी त्याचे गुण कही बदलत नाहीत...

अजुनही दुखतेच ते.. तेवढ्याच वेदना देते..
वाहता वाहता आवेगात कधी तरी जखमच वाढउन जाते...

खपली धरण म्हणजे काय हे मला ठाउकच नाही ..
कारण जखम माझी जिथे ..तिथले रक्त गोठतच नाही  ...

गोठले तर बरच होइल .. एकदाच काय ते थांबेल...
रक्त वाहिनीत अडकून एखाद्या.. रोज तूटणार मन तरी मारेल...

आहे अश्या जगण्या पेक्षा ते नक्की बरे ठरेल..
निनावी या देहाला एक नाव 'प्रेत ' तरी मिळेल...

--- श्रीहर्ष जून २००९

No comments:

Post a Comment